पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) गेल्या दहा वर्षांत तीन हजार ८६३ कोटी रुपयांची संचलन तूट निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही तूट भरून काढली जात असताना ‘पीएमपी’ने स्व-मालकीच्या बस कमी करून ७५ टक्के ठेकेदारांकडून बस सेवेत घेतल्या आहेत. ठेकेदारांचेच चालक आणि वाहक नेमले आहे. या कारभाराविरोधात पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा आपला परिसर संस्थेचे उज्वल केसकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पीएमपी तोट्यात आहे. गेल्या दहा वर्षात ३,८६३.१ कोटी रुपयांनी तोट्यात आहे. संचलन तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून निधी दिला जातो, तरी चालू वर्षात ७०६ कोटी रुपयांची संचलन तूट कायम असून पीएमपीकडून मात्र कंत्राटदारांच्या भरवशावर कारभार सुरु ठेवला आहे. दोन हजार बसपैकी संचलनात ७० टक्केच बस मार्गांवर धावत आहेत. उर्वरित बस देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली आगारातच आहेत. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. प्रवाशी तासंतास रस्त्यावर प्रतीक्षेत उभे राहत आहेत, याबाबत कुठले नियोजन, व्यवस्था करण्यात आली आहे. सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी कुठलेच नियोजन केले आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करत तातडीने बैठक घ्यावी, असे मागणीपत्र पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाला पाठवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंत्राटी बसबाबत काय नियोजन ?

सध्या पीएमपीच्या ८०० बस स्वत:च्या असून एक हजार १०० बस कंत्राटी तत्त्वावर ठेकेदारांकडून संचनात कार्यरत आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक बससाठी प्रति किलोमीटर ५८ रुपये दर असून यामध्ये ठेकेदार आणि वाहक यांचा समावेश असताना नव्याने ४०० बस सेवेत घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८४ किलोमीटर दर निश्चित करण्यात आला असून चालक आणि वाहकही ठेकेदारांचेच असल्याने प्रत्येक फेरीमागे मिळालेले सर्व उत्पन्न पीएमपीला मिळेल यावर नियंत्रण राहणार का, कोणती व्यवस्था असणार असे अनेक प्रश्न उपस्थित करून चर्चेची मागणी केली आहे.