लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण, या घटनेवरून बोध घेऊन, ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षातील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे मत राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

Yavatmal, mukhyamantri ladki bahin yojana, Women Protest Erupts in cm shinde speech, women s empowerment, protest, rain, chaos
मुख्यमंत्र्यांनी ‘खात्यात पैसे आले का’ विचारताच महिलांचा गोंधळ…अखेर भाषण थांबवून….
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य
mahayuti, Abdul Sattar, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, state level events, agriculture festival, political power
माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार
Aditya Thackeray
मविआ सत्तेत आल्यावर लुटारु मंत्री, अधिकाऱ्यांना कारागृहात टाकणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा
Devendra Fadnavis And Ajit Pawar News
NCP : अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, “देवेंद्र फडणवीस उत्तर द्या”, कुणाची मागणी?
Will Back Any Candidate Announced As Chief Minister Face Uddhav Thackeray
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा; उद्धव ठाकरे यांची भूमिका, महाविकास आघाडीने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण ठाणे जिल्ह्यात खासकरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत धुसफुस असल्याचे या घटनेने उघड केले आहे. ठाण्यातही भाजप आमदार संजय केळकर आणि शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचे दर्शन घडत असते. तर हाच प्रकार मिरा-भाईंदर, नवीमुंबई, कल्याण, उल्हासनगर याठिकाणी भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलेला आहे.

आणखी वाचा-कल्याण : गोळीबार घटनेमुळे हिललाईन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तीनही जागा जिंकणे महत्वाचे आहे. अशावळी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन महायुतीतील पक्षांतील तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे.