ठाणे – खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते याबाबत उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे. बियाणे, खते, किटकनाशके आणि इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांना या नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. अशी माहिती कृषि विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे.
खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी सुरु आहे. यावेळी काही व्यापाऱ्यांकडून खतांची आणि बियाणांची चढ्या दराने विक्री करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी तसेच
शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षामध्ये कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर त्यांच्या समस्येचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.
तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक
विभागीय कार्यालय, ठाणे- ८६९१०५८०९४, toqcthanediv@gmail.com
ठाणे- ७०३९९४४६८९, dsaothane.2013@rediffmail.com
पालघर- ९४०३८२१८७०, dsaopalghar@rediffmail.com
रायगड- ९५०३१७५९३४, dsaoraigad@gmail.com
रत्नागिरी- ८६६८९७२३३७, dsaortn@rediffmail.com
सिंधुदूर्ग- ९४०४३०५८४८, saosindhu@gmail.com