कल्याण- कल्याण पूर्वेतील एका ३१ वर्षाच्या व्यावसायिकावर तलवार, मोठ्या सुऱ्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ‘तू कोणत्याही पोलीस चौकीत जा, आमच्यावर काही होणार नाही,’ असे खुले आव्हान दिले. यामुळे हल्लेखोरांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काल रात्री हा प्रकार घडला.

हेही वाचा >>> ठाणे महापालिका अवकाळी पावसामुळे चिंतेत; रस्ते कामांवर परिणाम होण्याची भिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे त्यांचे आदेश आहेत की नाहीत, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कल्याण मध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत तलवारी, सुऱ्यांनी हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या वादाचे कारण पुढे करुन हे हल्ले केले जात आहेत. नसीम शेख (३१) हे व्यावसायिक कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागात राहतात. काल रात्री ते घराजवळील रिक्षेत भोजन झाल्यावर बसले होते. त्यावेळी तेथे आरोपी इरफान पिरजादे, बाबा पठारे, सागर पावस्कर, राकेश गायकवाड हातात दांडके, तलवारी, सुरे घेऊन आले. त्यांनी नसीम यांच्या तलवारी, सुऱ्याने हल्ला चढविला. नसीम यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरू असताना नसीम मोठ्या कौशल्याने त्यांच्या तावडीतून निसटले. ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी इरफान पिरजादे याने नसीमला ‘तु कोणत्याही पोलीस चौकीत जा, आमचे कुठेही काहीही होणार नाही.’ असे बोलून शिवीगाळ केली. नसीमच्या पत्नीलाही मारण्याची धमकी इरफान यांनी दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.