लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: स्वराज्य आणि सुराज्य यातील फरक सांगणारे, स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही हे जगाला सांगणारा आधुनिक इतिहासातील भारताचे नेते म्हणजे लोकमान्य टिळक होते असे मत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

sanjay raut spoke offensive and derogatory manner about female candidate navneet rana says girish mahajan
संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी

लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी असून प्रत्येक संकटाचे संधी मध्ये रूपांतर करणारे होते. भगवद् गीतेतील लोकसंग्रह या शब्दाचा अवलंब करत टिळकांनी कार्य केले. अशी माहिती डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थितांना दिली.’स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान या विषयावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

हेही वाचा… ठाणे मनोरुग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात!

थोर व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत. तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे विचारमंथन व्याख्यानमालेचे मुख्य उद्देश असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.