लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: वनहक्क कायद्याप्रमाणे आदिवासी आणि बिगर आदिवासी त्यांच्या हक्काची जमीन मिळणे अपेक्षित असतानाही वन हक्क दावेदारांना जमिनी मिळालेले नाहीत. आदिवासींना कायद्याप्रमाणे जमीन मिळावी या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील शेकडो आदिवासी आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले आहेत. वन जमिनीचा पुरावा घ्या आणि वन जमिनी नावे करा अशा घोषणा देत मोर्चेकरी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथूनजिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यात आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना वन जमिनी मिळणे अपेक्षित होते. या जमिनी मिळाव्यात यासाठी जिल्हास्तराव समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दाखल झालेल्या दाव्यांपैकी सुमारे 50 टक्के दावे अमान्य केले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा यावेळी आदिवासींनी काढला आहे. या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले आहेत