Water Crisis : भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणारी कर्नाटकची राजधानी बेंगळुरु सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. सातत्याने वाढणारे तापमान आणि पाणीटंचाई यांमुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. शहरातील वाढत्या पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, तेथील प्रशासनाने कार धुणे, बागेतील झाडांना पाणी घालणे यांसह अनेक कामांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही, तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आलेत. त्यावरून बेंगळुरूमधील पाणीटंचाईच्या भीषण स्थितीचा अंदाज येऊ शकतो.

अशात एका Reddit वापरकर्त्याने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, बेंगळुरूमधील जलसंकटाची स्थिती इतकी गंभीर आहे की, रहिवाशांना मॉल्समधील शौचालये वापरण्यास भाग पाडले जात आहे.

leopard fell into well for water, leopard water washim,
जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
titwala farmer death marathi news
टिटवाळ्यात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, फळेगाव-उतणे गावांमधील शेतकऱ्यांमध्ये वाद
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

पोस्टमध्ये म्हटले आहे की, शहरातील अनेक भाडेकरू घरे रिकामी करीत आहेत; तर काहींनी तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतर केले आहे. पॉश फ्लॅटमालक टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जात आहे. एक काळ असा होता की, जेव्हा लोक बंगळुरूच्या मॉल्समध्ये स्टार्टअप कल्पनांवर चर्चा करीत होते आणि आता त्याच मॉल्सचा वापर लोक अंघोळ आणि शौचालयासाठी करीत आहेत. कारण- त्यांच्या १.५ कोटींच्या फ्लॅटमध्ये पाणी नाही.

दरम्यान, फेसबुक, ट्विटरसह इतर अनेक सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवरही बेंगळुरूमधील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. सद्यस्थितीत बेंगळुरूमधील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन कामांसाठी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, अनेक टँकर चालकांकडून अनेकदा जास्त पैसे आकारले जात आहेत.

महापालिकेच्या पाण्याच्या टँकरजवळ लागलेल्या लांबच लांब रांगा आणि महागड्या पाण्याच्या टँकरवर पाणी भरणारे लोक हे चित्र शहरातील अनेक भागांत रोज पाहायला मिळतेय. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतेच राज्यातील १३६ तालुक्यांपैकी १२३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. त्यातील १०९ तालुके गंभीरपणे प्रभावित आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ५ मार्च रोजी आश्वासन दिले की, सरकार कोणत्याही किमतीत बेंगळुरूमधील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देईल.