Viral video: जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. अशातच शेतकरीही कशातच मागे नाहीत. यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते.

यात अनेक शेतकरी रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या टेक्निक वापरत असल्याचे पाहायला मिळते. अशाप्रकारे एका शेतकऱ्याने रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी डुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून पिता, पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सकाळच्या सुमारास शेतात आलेल्या बाप-लेकाचा डुकरासाठी लावलेल्या झटका मशीनच्या तारांचा शॉक लागून मृत्यू झाला. एकाच लाईनमध्ये बाप-लेक आणि बैल जमीनीवर पडलेले दिसत आहेत. हे दृश्य पाहून अंगावर काटा येत आहे. यातून शेतकऱ्यांनी धडा घेऊन शेतात काहीही प्रयोग करण्याआधी नक्की सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. शेतकरी वर्षभर शेतात घाम गाळून पिकं उभी करतात आणि डुक्करांसारखे प्राणी येऊन ही सगळी मेहनत उध्वस्त करतात. शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात. मात्र हे करताना त्याच्या परिणामांचीही शक्यता लक्षात घेतली पाहिजे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ kiratankar9021’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मींडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर आता अनेकजण हळहळ व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “शेतकऱ्यांचे जीवनच शेतीच्या पिकांवर अवलंबून असते जर पीकच झाले नाही तर शेतकरी जगणार कसा पीक वाचवण्यासाठी झटका मशीन लावावा लागतो कारण त्याचे जीवन पिकावरच अवलंबून असतं . कधी दुःख कधी सुख..” तर आणखी एकानं, “झटका मशीन लावण्या पेक्षा १००, २० कुत्रे पाळावी शेतात. जे रोडवर लावारीस पणे इकडे तिकडे पळतात पिल्ले त्यांना पाळावे . डुक्कर काय माणुस पण येऊ देणार नाहीत”