India-Pakistan and PUBG: प्रेमासाठी वाटेल ते करणारे लोकं आपण चित्रपटात किंवा फारतर मालिकेत पाहतो. काहीवेळी प्रत्यक्षातही अशाप्रकारच्या घटना आपल्या कानावर पडतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. PUBG गेम खेळणारा भारतीय तरुण चार मुलांच्या पाकिस्तानी आईच्या प्रेमात पडला. या महिलेचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन आहे. ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली.

दरम्यान, पाकिस्तानी महिलेचा पती गुलाम हैदर याने भारत सरकारकडे विनंती केली आहे. सीमा यांचे पती गुलाम हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली असून, “त्यांची पत्नी आणि चार मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे”. त्या व्यक्तीने व्हिडीओ बनवून भारत सरकारला हे आवाहन केले आहे. ती व्यक्ती सध्या सौदी अरेबियात आहे जिथे तो काम करतो. व्हिडिओमध्ये गुलाम हैदर यांनी नरेंद्र मोदी सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

(हे ही वाचा: भर लग्नमंडपात स्टेजवरच नवरीने नवरदेवाला किस केलं अन्…; भन्नाट Viral Video पाहून चक्रावाल )

त्याची पत्नी आणि मुलांना त्यांच्या मायदेशी पाकिस्तानात परत पाठवायचे आहे. आपल्या पत्नीला PUBG च्या माध्यमातून भारतात येण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गुलाम हैदर यांनी नरेंद्र मोदी सरकारला त्यांच्या पत्नी आणि मुलांना सुरक्षितपणे पाकिस्तानात परतण्यासाठी आवाहन केले, जिथे ते कुटुंब म्हणून पुन्हा एकत्रित येऊ शकतील. तसेच सिमा हैदरच्या पतीने भारतीय माध्यमांचे आभारही मानले आहे ज्यामुळे त्याच्या पत्नी आणि मुलांची माहिती मिळाली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात PUBG या गेमिंग अॅपने झाली. पाकिस्तानी महिला सीमा हैदर PUBG खेळायची, यादरम्यान भारतातील सचिनसोबत खेळताना ओळख झाली अन् काही दिवसातच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सचिन ग्रेटर नोएडा येथे राहतो. ही महिला आधीच विवाहित आहे आणि ती तिच्या पतीसोबत पाकिस्तानमध्ये राहायची पण कोणताही विचार न करता सचिनसाठी ती पाकिस्तानची सीमा ओलांडून वैध व्हिसाशिवाय चार मुलांना सोबत घेऊन भारतात पोहोचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीमा नेपाळमार्गे महिनाभरापूर्वी भारतात पोहोचली होती. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते वकिलाकडे गेले असता तिच्याकडे व्हिसा नसल्याचं उघडकीस आलं आणि ती भारतात बेकायदेशीपणे आल्याचे कळताच वकिलाने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरुनच पोलिसांनी सीमा, सचिन आणि त्याच्या वडीलांना अटक केली असून १४ दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही आता जामीन मिळाला आहे.