महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक अन् सांस्कृतिक वारसा लाभला आहे. गड किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव असून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गड-किल्ले जिंकून स्वराज्याची स्थापना केली. या किल्ल्यांवर अनेक सुंदर मंदिरे बांधेलेली आहेत. हे किल्ल्यांची रचना, येथील सुंदर शिल्प ही स्थापत्य कलेची सुंदर उदाहरण आहे ज्यांना आपण जपले पाहिजे. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढीपर्यंत पोहचवला पाहिजे. हे गड किल्ले आपल्याला नेहमी इतिहासीच आठवण करून देतात. म्हणूनच गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आज अनेक लोक प्रयत्न करत आहेत पण काही लोकांना मात्र अजूनही या गड- किल्ल्यांचे महत्व उमगलेले नाही. ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याऐवजी काही लोक तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर तात्पुरत्या प्रसिद्धीसाठी काही लोक जीव धोक्यात टाकून किल्यांवर स्टंटबाजी करताना दिसत आहे. नुकताच असाच एक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एक तरुण एका किल्ल्यावरील गोल कड्याला पकडून खोल दरीमध्ये लटकत आहे. तरुणाने व्हिडीओसाठी स्वत:च जीव तर धोक्यात टाकला आहे पण त्याच्या या कृतीमुळे किल्ल्याच्या वास्तुचे नुकसान होऊ शकते.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण एका गडावर असल्याचे दिसते जिथून दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहे. खोल दरी दिसत आहे. सर्वत्र हिरवळ पसरलेली दिसत आहे. हा तरुण गडाच्या एका गोल कड्याजवळ उभा आहे. अचानक हा तरुण त्या गोल कड्याला दोन्ही हातांनी पकडतो आणि पाय हवेत सोडून थेट दरीमध्ये लटकतो. एवढंच नाहीतर हा तरुण त्या गोल कड्याला लटकत कसरत करत आहे. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा टोका चुकत आहे कारण तो तरुण स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहे. चुकूनही त्याचा हात निसटला तर तो थेट दरीत पडू शकतो. पण त्या तरुणाला ना स्वत::च्या जीवाची पर्वा आहे ना गडाच्या संवर्धनाची. त्याची एक चूक त्याच्या जीवावर बेतू शकते हे माहित असूनही तो तरुण स्टंटबाजी करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ patlancha_ninad नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ज्या आई-वडीलांनी जन्म देऊन तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं, त्याची जाणीव असू द्या.”
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/p/DKxIUV5yfmr
व्हिडिओ पाहून दुर्ग प्रेमींचा संताप अनावर होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत तरुणाच्या कृतीवर टिका केली.
एकाने कमेंट केली की,”अशा मुलांमुळे महाराष्ट्राचे नाव खराब होते.”
दुसऱ्याने कमेंट केली की,”ऐतिहासिक वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे रे दादा, चुकून तो कडा तुटला तर हा ठेवा नष्ट होईल. का इतिहासाची वाट लावता रे.”
तिसऱ्याने लिहिले की, “हरिहर गड हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असून त्याला धक्का पोहचवणे, हे ऐतिहासिक वास्तूंच्या भागांना लटकून आपण चुकीचे कृत्य करत आहात हे याच्यात या व्हिडिओ दिसत आहे.”
चौथ्याने कमेंट केली आहे की,””आई वडिलांनी मेहनत करून वाढवायचे आणि पोरांनी आयुष्याला खेळ समजायचे.”
पाचव्याने कमेंट केली की,”तो इतिहासकालीन गोल कडा तुटला असता तर..”
ऐतिहासिक वास्तूचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी काही लोकांनी केली.