अनेक लोकांबरोबर असे घडते की नोकरीवर रुजू होतात पण लवकरच कंटाळून जातात आणि नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. त्यामागे वेगवेगळे कारण असू शकते. नुकताच एचआरच्या पोस्टवर काम करणाऱ्या एका महिलेने खुलासा केला आहे की, काही महिन्यानंतर कर्मचारी नोकरी का सोडतात? Impact Infotech Pvt Ltd च्या HR, भारती पवार यांनी LinkedIn वर एक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये कोणत्या कारणामुळे कर्मचारी काही महिन्यांत नोकरी सोडतात हे स्पष्ट केले आहे.

त्यांनी LinkedIn वर लिहिले, “कर्मचारी केवळ ६ महिन्यांत किंवा वर्षभरात निघून जाण्यासाठी कंपनीमध्ये रुजू होत नाहीत. ते टॉक्सिक वर्कलाईफ, कमी पगार, ओव्हरटाईम, त्यांच्या मर्यादेपलीकडे काम करण्याचा दबाव, घराणेशाही आणि कार्यालयीन राजकारणामुळे नोकरी सोडतात. ” “कोणालाही पुन्हा पुन्हा नोकरी सोडणे आवडत नाही अशा वातावरणामुळे नोकरी सोडण्याची वेळ त्याच्यावर येते,” असा निष्कर्ष त्यांनी काढला.

Why employees leave after six months 4 Big Reasons
सहा महिन्यानंतर नोकरी सोडून का जातात कर्मचारी?

हेही वाचा – “क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video

लोकांनी सांगितले आपले अनुभव –
काही तासांतच त्याच्या पोस्टवर १३०० हून अधिक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही वापरकर्ते एचआर एक्झिक्युटिव्हशी सहमत असल्याचे दिसत असताना, इतरांनी त्यांच्या अनुभव शेअर केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “कंपनीत सामील होण्यापूर्वी प्रत्येक कंपनीचे Glassdoor आणि इतर तृतीय पक्षांद्वारे पूर्ण तपासणी केली पाहिजे. केवळ नियोक्त्याला नकार देण्याचा अधिकार का असावा? कर्मचाऱ्यांनाही तो असले पाहिजेत आणि त्यासाठी मजबूत कायदे किंवा नियम उपाय असले पाहिजेत. वाईट नियोक्तांवर खटला चालवा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या युजरने लिहिले, “मी देखील गेल्या काही आठवड्यांपासून याचा सामना करत आहे. मी कितीही मेहनत केली तरी, माझे व्यवस्थापक मला नेहमीच अपमानास्पदपणे फटकारतात. केवळ मीच नाही तर माझे सर्व सहकारी देखील याच समस्येचा सामना करत आहेत. जिथे प्रामाणिक कर्मचाऱ्याच्या सहनशीलतेची पराकाष्ठा केली जाते.