वसई– वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी देण्यास सुरवात झाली आहे. उद्घटानामुळे लांबलेले पाणी अखेर आंदोलनांमुळे उद्घटन न करता देण्यास आले आहे. वसई विरारकरांना पाणी मिळू लागल्याने आता त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.

वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची योजना एमएमआरडीएने तयार केली होती. या पाण्याला होणारा विलंब आणि दुसरीकडे पाणी टंचाईमुळे नागरिकांचे होणारे हाल यामुळे राजकारण पेटले होते. राजकीय श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी पाण्याचे वितरण थांबवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. शिवसेना ठाकरे गटाने थेट एमएमआरडीएवर मोर्चा काढला तर भाजप, शिवसेना मनसेने मोर्चे काढले. परिवर्तन संघटनेच्या मयुरेश वाघ आणि खासदार राजेंद्र गावित यांनी पाच जलआक्रोश मोर्चे काढले होते. आगरी सेनेच्या ३ महिलांनी तर आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर ६ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पाणी सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. आगरी सेनेचे आंदोलन या प्रकरणी निर्णायक ठरले होते. आता चाचणीनंतर पाणी सुरू करण्यात आले असून टप्प्या टप्प्याने हे पाणी नागरिकांना मिळणार आहे.

Maharera, Maharera Implements Self Declaration, Self Declaration Requirement, Housing Project Quality, construction, Mumbai, marathi news,
गुणवत्तापूर्ण बांधकामांसाठी महारेराचा पुढाकार, आता विकासकांना गुणवत्ता हमीचे स्वयंप्रमाणित घोषणापत्र सादर करावे लागणार
Mumbai Municipal Corporation , Conservation Efforts Baobab Trees, Baobab Trees, bmc tree plantation and conservation, bmc news, Baobab Trees news,
मुंबई : बाओबाब झाडांच्या संरक्षणासाठी पालिकेला आली जाग
Municipal Commissioner Bhushan Gagrani ordered to speed up process of auctioning seized goods of defaulters
थकबाकीदारांच्या जप्त वस्तूंच्या लिलावाच्या प्रक्रियेस वेग द्यावा, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश
Developers benefit from the sludge of Gangapur Demand to stop silt removal work due to leaving farmers
‘गंगापूर’च्या गाळातून विकासकांचे भले? शेतकऱ्यांना डावलल्याने गाळ काढण्याचे काम बंद करण्याची मागणी
garbage dump, Solapur, fire,
सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग
ED , investigation, Tadoba,
ईडीने सुरू केला ताडोबा प्रकल्पातील १२ कोटींच्या घोटाळ्याचा तपास
How many applications filed under RTE only two days left to fill the application
आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल? अर्ज भरण्यासाठी राहिले दोनच दिवस!
demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर

हेही वाचा >>> करोनाकाळात उभारलेले प्राणवायू प्रकल्प पडून; साथीनंतर मागणी नसल्याने महापालिकांसमोर देखभालीचा प्रश्न

पाणी आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी श्रेय घेण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पाणी लांबणीवर पडल्याचा आरोपामुळे भाजप आक्रमक झाला आहे. खासदारांनी पंतप्रधानां उदघटान करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ते झाले नसल्याने पंतप्रधांनावर टिका होऊ लागली. पाणी प्रकरणात पतंप्रधानांची बदनामी होत असल्याने याप्रकरणी पालिकेने श्वेतपत्रिका काढून खरी परिस्थिती समोर आणावी अशी मागणी भाजपाचे उपजिलाध्यक्ष आणि प्रवक्ते मनोज बारोट यांनी केली आहे.

गावितांनी मानले सर्वांचे आभार

वसईकरांना पाणी मिळावे यासाठी सर्वच पक्ष संघटना प्रयत्नशील होते. यासाठी मी अनेकदा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता असे खासदार गावित यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचे श्रेय केवळ एकाचे नसून सर्वाचे आहे, असे सांगत त्यांनी पाणी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

बविआ भविष्यातील प्रकल्पांच्या मागे

राजकीय श्रेय घेण्याच्या चढाओढीत नसणार्‍या बविआने मात्र शांतपणे काम सुरू ठेवले आहे. १९९६ पासून पाणी प्रकल्पासाठी आमदार हितेंद्र ठाकूर काम करत होते. आम्ही पत्रकबाजी न करता प्रत्यक्ष काम करत आहोत. राजकारणी श्रेयवादात अडकले आहेत आम्ही मात्र भविष्यातील खोलसापाडा, देहर्जी प्रकल्पाच्या कामाच्या मागे लागलेलो आहोत, असे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.