शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. निवडणुकीत दोन्ही गट आमने सामने आले आहेत. अशावेळी नेते गेले तरी कार्यकर्ते आहेत, अशी परिस्थिती आहे का? या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंबरोबर कडव्या शिवसैनिकांची संख्या जास्त असल्याचंही ते म्हणाले.