पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांचं वारंवार येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच आमदार सुनील टिंगरे यांच्यावरही विरोधकांनी काही आरोप केले आहेत. यानंतर आता सुनील टिंगरे यांनी माध्यमांशी संवाद साधत या पूर्ण घटनेबाबत स्पष्टीकऱण दिलं आहे.