* येत्या १६ मे रोजी राज्यभर परीक्षा  *सर्वात जास्त ६८९२३ विद्यार्थी मुंबई विभागातून  * सर्वात जास्त ३३९०३ विद्यार्थी एकटय़ा पुण्यातून  * सर्वात कमी १३०१ विद्यार्थी हिंगोलीतून

तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने अभियांत्रिकी आणि औषधविज्ञान शास्त्र विषयांसाठी होऊ घातलेल्या एमटी-सीईटीसाठी राज्यातील २,८५,१११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी एमएचटी-सीईटी घेतली जायची. यावर्षी त्यातून वैद्यकीय प्रवेश वगळण्यात आले आहेत. एकूण आठ विभागातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येकी अभियांत्रिकी, औषधविज्ञान शास्त्राच्या प्रवेश परीक्षेबरोबरच दोन्ही परीक्षा देणारेही विद्यार्थी आहेत. फक्त अभियंता होऊ इच्छिणारे १,४७,७०६ विद्यार्थी आहेत. औषधविज्ञान शास्त्राला पसंती देणारे २४,३६१ विद्यार्थी आहेत तर दोन्ही विषयांसाठी उत्सुक असलेले १,१३,०४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे.
अमरावती विभागात २०,४९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात अकोला ४३०१, अमरावती ५७७५, बुलढाणा ४५३९, वाशिम १६५८ आणि यवतमाळमधून ४२२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी केवळ अभियांत्रिकीसाठी सीईटी देणारे ९१४८, केवळ औषधविज्ञानशास्त्रासाठी १००२ आणि दोन्ही परीक्षा देणारे २०४०६ विद्यार्थी आहेत. औरंगाबाद विभागातून औरंगाबादचे ९४७८, बीडचे ४८३३, जालन्याचे १८९२ आणि उस्मानाबादचे २५२० विद्यार्थी असे एकूण १८,७२३ विद्यार्थी सीईटी देणार आहेत. त्यापैकी अभियांत्रिकीसाठी ८२७१ विद्यार्थ्यांनी, फार्मसीसाठी १९७१ आणि दोन्हीसाठी ८४८१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. कोल्हापूर विभागातून कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्गमधील अनुक्रमे १११८१, ३३०१, ८२८९ आणि १९६८ असे एकूण २४,७३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकीसाठी १४६६५, फार्मसीसाठी २९८६ आणि दोन्ही परीक्षेसाठी ७०८८ विद्यार्थी बसणार आहेत.
मुंबई विभागातून सर्वात संख्येने विद्यार्थी एमटी-सीईटी देणार आहेत. त्यामध्ये मुंबई शहरातून ९८९४, मुंबई-सुबुरबन २६१११, रायगड ७३४० आणि ठाण्यातून २५५५८ असे एकूण ६८९२३ विद्यार्थी सीईटी देणार आहेत. त्यात ३९७८५ केवळ अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत. ४३०१ फार्मसीला आणि २४८३७ विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत. नांदेड विभागातून केवळ १७५७८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यापैकी हिंगोलीतून १३०१, लातूरमधून ७९०३ नांदेडमधून ४९५७ आणि परभणीतून ३४१७ विद्यार्थी सीईटी देणार आहेत. पैकी ९१८७ विद्यार्थ्यांची केवळ अभियांत्रिकीला, २१३८ विद्यार्थ्यांची फार्मसीला आणि दोन्ही परीक्षा देण्यास ६२५३ विद्यार्थी उत्सुक आहेत. नाशिक विभागात अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक हे जिल्हे येतात. त्यामध्ये अनुक्रमे १५५८१, ५६५९, ९५६८, ३४९६ आणि १३६९६ अशा एकूण ४८००० विद्यार्थ्यांनी एमटी-सीईटीला पसंती दर्शवली आहे. त्यामध्ये १६८६४ विद्यार्थी अभियांत्रिकीचे, ५७१२ फार्मसीचे तर २५,४२४ आणि दोन्हीचे मिळून ४८,००० विद्यार्थ्यांना एमटी-सीईटी द्यायची आहे. पुणे विभागातून ५२९१० विद्यार्थी प्रवेश परीक्षेस उपस्थित राहतील. त्यामध्ये एकटय़ा पुण्यातून ३३९०३, साताऱ्यातून ९०२१ आणि सोलापुरातून ९९८६ विद्यार्थी असतील. पैकी ३०२९५ अभियांत्रिकीची, ५४९९ फार्मसीची आणि १७११६ विद्यार्थी दोन्ही विषयांच्या परीक्षा देतील.
नागपूर विभागातून ३३७४० विद्यार्थ्यांनी एमटी-सीईटी देण्यास उत्सुकता दर्शवली. त्यात अभियांत्रिकीचे १९४९१, औषधनिर्माणशास्त्राचे ७५२ आणि दोन्ही परीक्षा देणारे १३,४९७ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. भंडाऱ्यातून ३२७६, चंद्रपुरातून ५५२२, गडचिरोलीतून १३०२, गोंदियातून २९५६, नागपुरातून १७,२७१ आणि वध्र्यातून  ३४१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एमटी-सीईटीचे १६ मे रोजी प्रत्येकी ३०० गुणांचे तीन पेपर आहेत. पहिला पेपर सकाळी १० ते ११.३० आहे. त्यात पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयांवरील प्रश्न असतील. दुपारी १२ ते १.३०पर्यंत जीवशास्त्र आणि दुपारी तीन ते ४.३०पर्यंत तिसरा गणिताचा पेपर असेल. नागपूर विभागासाठी एकूण १०१ परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी गडचिरोलीला सात, भंडाऱ्याला १०, गोंदियाला ११, वध्र्याला १० आणि चंद्रपूरला २० परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्य़ाला जिल्हा संपर्क अधिकारी नेमले असून जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीत या परीक्षा होणार असल्याचे नागपूर विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी सांगितले.