सततच्या पावसामुळे वान प्रकल्प तुडूंब भरू लागला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे ६ पैकी ४ दरवाजे रविवारी उघडण्यात आल्याने नदी काठच्या तालुक्यातील १२ गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
तसेच जिल्ह्य़ातील इतरही प्रकल्पांच्या जलपातळीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ात पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री, तर सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्य़ात संततधार पाऊस सर्वत्र सुरू आहे. अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. प्रकल्प परिसरातही हा पाऊस चांगला होत असल्यामुळे जल पातळीत वाढ होत आहे. संग्रामपूर तालुक्यातील वान प्रकल्प सध्या ८० टक्के भरला आहे. येत्या २४ तासात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला, तर प्रकल्पातील जलपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने वान प्रकल्पाचे चार दरवाजे काही सें.मी. उघडे करण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
वान प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडले, १२ गावांना इशारा
सततच्या पावसामुळे वान प्रकल्प तुडूंब भरू लागला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे ६ पैकी ४ दरवाजे रविवारी उघडण्यात आल्याने नदी काठच्या तालुक्यातील १२ गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
First published on: 17-07-2013 at 09:37 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 doors open of wan project