होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
२२ ते २७ मार्च या कालावधीत जादा गाडय़ा सोडण्यात येतील. महामंडळाच्या ठाणे विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, बोरिवली नॅन्सी कॉलनी, कल्याण, विठ्ठलवाडी आगारांमधून या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
एक महिना आधीपासून या जादा गाडय़ांचे आरक्षण भाविकांना करता येणार आहे. आरक्षणासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि बोरिवली येथे खासगी एजंटही नियुक्त करण्यात करण्यात आले असल्याचे महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2013 रोजी प्रकाशित
होळीसाठी महामंडळातर्फे जादा गाडय़ा
होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
First published on: 05-02-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St mahamandal will arrenges extra buses for holi