राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.Read More
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी चळवळीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा तळागाळात पोहोचविण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित…
सुरुवातीच्या टप्प्यात मरगळलेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता गती घेताना दिसत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी सुरुवातीची मरगळ झटकून मतदारसंघात…
मागील काही काळापासून असलेले मतभेद, दुरावा विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलढाणा मतदारसंघातील अपक्ष तथा संघटनेचे जुनेजाणते कार्यकर्ते रविकांत तुपकर यांना…
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…