हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक आपल्या गुरूंची पूजा करतात. तसेच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. यंदा गुरुपौर्णिमा १३ जुलै बुधवारी साजरी होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी ग्रहांचा विशेष युतीही तयार होत आहे. यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तीन प्रमुख ग्रह एका राशीत बसून त्रिग्रही योग तयार करतात. या दिवशी सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह मिथुन राशीमध्ये एकत्र असतील. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण ३ राशी आहेत ज्यांना या योगातून चांगला पैसा मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मिथुन: तुमच्या राशीवरून लग्न भावमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळू शकते. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जे अनावश्यक खर्च केले जात होते त्यावर अंकुश ठेवता येईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. या काळात तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. तसेच भागीदारीच्या कामात चांगले यश मिळू शकते.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा

आणखी वाचा : Vinayak Chaturthi 2022: यंदा विनायक चतुर्थीच्या दिवशी बनतोय खास योग, अशा प्रकारे गणपतीला प्रसन्न करा

धनु: तुमच्या गोचर कुंडलीतून सातव्या भावात त्रिग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती किंवा वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता.

आणखी वाचा : राहू-मंगळ युती: ‘या’ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या! अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात

वृषभ : तुमच्या राशीतून द्वितीय भावात त्रिग्रही योग तयार होत आहे. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच दिलेले पैसे परत मिळू शकतात. पैशाचे नवीन स्रोत मिळू शकतात. समाजातही तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.