scorecardresearch

भारतीय पोस्ट भर्ती २०२१: १०वी आणि १२वी उत्तीर्णांसाठी पोस्ट विभागात भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

पोस्ट विभागातील या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.

lifestyle
रिक्त पदांची संख्या ६० असून अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. (photo: file photo)

भारतीय टपाल विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पोस्ट विभागाने बिहार सर्कलमध्ये अनेक रिक्त जागा सोडल्या आहेत. ही भरती पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमनसह अनेक पदांसाठी आहे. रिक्त पदांची संख्या ६० असून अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.

पोस्ट विभागातील या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

रिक्त पदे व शैक्षणिक पात्रता

रिक्त पदांमध्ये टपाल सहाय्यकांची ३१, एमटीएसची १३, वर्गीकरण सहाय्यकांची ११ आणि पोस्टमनची ५ पदे आहेत. पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमनच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी १२वी पास असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, एमटीएस पदांसाठी, १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा-

अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जा.
वेबसाइटच्या होम पेजवर, रिक्रूटमेंटच्या लिंकवर क्लिक करा.
पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमनच्या लिंकवर क्लिक करा.
विनंती केलेली माहिती भरा.
नोंदणी करा आणि अर्ज भरा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2021 at 17:10 IST

संबंधित बातम्या