पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. सचिव पातळीवरील चर्चा रद्द करून भारताने सर्व प्रलंबित मुद्दय़ांवर चर्चा करण्याची आणखी एक संधी गमावली असल्याचाही ठपका त्यांनी ठेवला. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान केव्हाही तयार आहे, असे त्यांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट केले.