कांचनगंगा हे नेपाळमधलं सर्वोच्च शिखर मानलं जातं. या शिखरावर पोहचताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. बिप्लब बैद्य आणि कुंतल कनरार अशी या दोघांची नावं आहेत. बिप्लब बैद्य हे ४८ वर्षांचे तर कुंतल हे ४६ वर्षांचे होते. बिप्लब बैद्य गिर्यारोहण करताना आजारी पडले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर कुंतल करनार शिखरावर चढताना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. बैद्य हे ८ हजार ५८६ मीटर्स अंतरापर्यंत चढाई करून गेले होते. Reuters: Two Indian climbers died near the summit of Mount Kanchenjunga during an expedition on the world’s third highest mountain, in Nepal. — ANI (@ANI) May 16, 2019 बिप्लब बैद्य हे आजारी झाले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं समजतं आहे. एएनआय आणि रॉयटर्स या दोन वृत्तसंस्थांनी या संदर्भातले वृत्त दिले आहे. कांचनगंगा हे नेपाळमधले सर्वोच्च शिखर आहे.