पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण केलेले काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी पीओकेत जाऊन दहशतवादी तळांवर भारतीय वायूसेनेने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे. दहशतवाद्यांचा विनाश अनिवार्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘लोहा लोहे को काटता है, आग आग को काटती है, सांप जब डंक मारता है, उसका एंटीडोट विष ही है. भारतीय वायूसेना की जय हो. जय हिंद जय हिंद की सेना,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.