यंदा देशभरात झालेल्या कांद्याच्या विक्रमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी शेतकऱ्यांकडून १५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. विक्रमी उत्पादनामुळे सध्या बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याच्यादृष्टीने सरकारने शेतकऱ्यांकडून बाजारभावाने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एकुण उत्पादनाच्या तुलनेत सरकारची ही खरेदी नगण्य असल्याने शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फारसा फायदा होणार नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यंदा महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन १३ हजार टनांनी वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याचे भाव गडगडण्याच्या स्थितीत आहेत. नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत सध्या कांद्याचा दर प्रतिकिलो ३ रूपये इतका आहे. विक्रीचा भाव खालावल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देण्याच्यादृष्टीने केंद्राने नाशिक जिल्ह्यापासून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
केंद्र सरकार १५ हजार टन कांदा खरेदी करणार; शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
विक्रमी उत्पादनामुळे सध्या बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर कांदा उपलब्ध आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 04-05-2016 at 16:20 IST
TOPICSकांदाOnionकेंद्र सरकारCentral Governmentदुष्काळ (Drought)DroughtनाशिकNashikशेतकरीFarmers
+ 1 More
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government decide to buy onion from farmers