Father of zipline operator on viral Pahalgam attack video : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशाच एका व्हिडीओत एक झिपलाइन ऑपरेटर गोळीबार सुरू होण्याच्या आधी अल्लाहू अकबर म्हणत असताना दिसून आला होता. या व्हिडीओनंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यादरम्या झिपलाइन ऑपरेटर मुझाम्मिलच्या वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांच्या मुलाला या हल्ल्याबद्दल आधीच माहिती होती का? या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहे. “मी व्हिडिओ पाहिला नाही… आम्ही मुस्लिम आहोत, वादळ जरी आलं तरी आम्ही ‘अल्लाहू अकबर’ म्हणतो,” असे मुझम्मिलचे वडील पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले आहेत.
VIDEO | Anantnag: "I have not watched the video… We are Muslims, even if the storm comes we say 'Allahu Akbar'," says father of zipline operator Muzammil who was seen saying 'Allahu Akbar' in a video which was recorded during Pahalgam terror attack.
— Press Trust of India (@PTI_News) April 29, 2025
(Full video available on… pic.twitter.com/22uOZKFoj3
नेमकं काय घडलं?
जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला तेव्हा मुझम्मिल हा बैसरन येथे झिपलाइन ऑपरेटर म्हणून काम करत होता, त्यानंतर त्याला एनआयए आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
गुजरातमधील एका पर्यटक ऋषी भट्ट यांनी आरोप केला की, गोळीबार सुरू होण्यापूर्वी मुझम्मिलने तीन वेळा ‘अल्लाहू अकबर’ असे म्हटले. “माझ्या आधी नऊ जण झिपलाइनवर गेले, पण ऑपरेटरने एकही शब्द उच्चारला नाही. मी घसरत जात असताना तो बोलला आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला… त्याने तीन वेळा ‘अल्लाहू अकबर’ म्हटले आणि मग गोळीबार सुरू झाला,” असे भट्ट यांनी एएनआयला सांगितले.
भट्ट यांनी झिपलाइनवर असताना रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या मागे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचा थरार कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Zipline operator seen in viral video who was chanting Allahu Akbar and looked like intentionally sending tourist between terrorist attacks has been detained by security forces for questioning in Pahalgam terror attack probe. pic.twitter.com/r5PUSztI01
— Baba Banaras™ (@RealBababanaras) April 28, 2025
दरम्यान या दहशतवादी हल्ल्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व साक्षीदारांना प्रशासनाकडून समन्स पाठवण्यात आले आहे. यंत्रणांकडून या हल्ल्यासाठी स्थानिकांकडून मदत करण्यात आली का? याचा तपास केला जात आहे.
केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना आणि त्यांच्या मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार रद्द केला, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द केले असून अटारी सीमा देखील बंद करण्यात आली आहे.