संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. विरोधी पक्षातील या खासदारांनी संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी त्यांना अधिवेशन संपेपर्यंत सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत म्हणाले, खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी आम्ही लढणार आहोत. या देशातील हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याविरोधात लढणार आहोत. गुडघे टेकायला आम्ही मिंधे नाही. लोकशाहीचं मंदिर मोडून टाकायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं. लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराचं उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही.

Know the history behind the historic temple dedicated to Yamraj, which Kangana Ranaut visited
कंगना रणौतने निवडणुकीतील यशासाठी घातले साक्षात यमराजालाच साकडे; काय आहे गूढ यमराज मंदिराचा इतिहास?
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

हेही वाचा >> पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना विरोध म्हणून खरगेंचं नाव पुढे? संजय राऊत म्हणाले, “सत्तेवर येण्याची…”

“राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर संसदेची प्रतिष्ठा राहिली पाहिजे. दिल्लीतील सर्वोच्च संसदेतील मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन तुम्ही नौटंकी करणार असाल तर राम तुम्हाला पावणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

मंगळवारी ४९ खासदारांचं निलंबन

‘इंडिया’ आघाडीतील खासदारांच्या निलंबनाचे सत्र मंगळवारीही सुरू राहिले. कथितरीत्या आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील आणखी ४९ खासदारांवर कारवाई करण्यात आली असून गेल्या पाच दिवसांमध्ये दोन्ही सभागृहांतील एकूण १४१ खासदारांचे अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजपप्रणीत सरकारने नव्या संसद भवनात खासदार निलंबनाचा वेगळाच इतिहास रचल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. संसदेतील सुरक्षाभंगाच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभागृहांमध्ये येऊन निवेदन देण्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी दोन्ही सभागृहांत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी १३ व सोमवारी ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

इंडिया आघाडीच्या बैठकीत काय ठरलं?

संजय राऊत म्हणाले, इंडिया आघाडीची पाटणा, मुंबई आणि बंगलोर येथे बैठक झाली. दिल्लीत काल जी बैठक झाली तिथे समन्वयक, पंतप्रधान या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली. बहुसंख्य पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. काल उद्धव ठाकरे दिल्लीत होते. त्यांनी महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या.. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह बैठक घेतली. इंडिया आघाडीच्या बैठकीआधीही उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव आला. काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्या पक्षात चर्चा होईल, मग निर्णय होईल.