मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. विविध राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या घरावर जमावाकडून हल्ला केला जात आहे. शुक्रवारी रात्री आणखी एका नेत्याच्या घराला लक्ष्य करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी रात्री इंफाळमध्ये संतप्त जमावाने भाजपा नेते व ‘पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग अँड कन्जुमर अफेअर्स’ राज्यमंत्री एल सुसिंद्रो मेईतेई यांच्या खासगी गोदामाला आग लावली आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठकी पार पडण्याच्या आदल्या रात्री भाजपा मंत्र्याच्या खासगी गोदामावर हल्ला केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्व इंफाळमधील खुराई येथे घडली. संतप्त जमावाने सुसिंद्रो मेईतेई यांच्या खासगी गोदामाला आग लावली. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर केला, याबाबतचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलं आहे.

हेही वाचा- पंतप्रधान मन की बात ऐवजी ‘मणिपूर की बात’ कधी करणार? मणिपूर भारताचाच भाग आहे ना? विरोधकांचे सरकारला प्रश्न

गेल्या महिनाभरात, इम्फाळ परिसरात अनेक नेत्यांच्या निवासस्थानांवर संतप्त जमावाने हल्ले केले आहेत. यामध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह, राज्याचे कॅबिनेट मंत्री नेमचा किपगेन, मणिपूरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंदास कोंथौजम, उरीपोकचे आमदार रघुमणी सिंह, सुग्नूचे आमदार के रणजीत सिंह आणि नौरिया पखंगलकपाचे आमदार एस केबी देवी आदि नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा- अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’चा नारा, “मोदी खूनी आहेत” म्हणत नागरिकांकडून निषेध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. देशातील एका भागात हिंसाचार उफाळला असताना पंतप्रधान मोदी विदेशी वाऱ्या करत आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.