देशातील कोणत्याही नागरिकाला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही, असे सांगत बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आपला सहअभिनेता आमीर खानच्या मदतीला धावून आला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाहरूख खान म्हणाला, देशाबद्दल चांगला विचार करणे आणि चांगले काम करणे याशिवाय देशासाठी आणखी वेगळे काही काम करण्याची गरज नसते. प्रत्येकाने देशाच्या भल्यासाठीच काम केले पाहिजे. जर मी माझ्यावरील जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असेल, तर मला देशासाठी आणखी वेगळे काही करण्याची गरज नाही. माझ्या कामातूनच देशाला फायदा होणार आहे. पण जर मी भ्रष्टपणे वागत असेल, तर नक्कीच त्यातून माझ्या देशाची प्रतिमा मलिन होणार आहे.
सोशल मीडियाच्या साईट्सवर लोक मुक्तपणे आपली मते मांडत असतात. त्यामध्ये काही जण तीव्र विरोधाच्या प्रतिक्रियाही व्यक्त करतात. त्यातून दुसऱ्याची बदनामी केली जाते. यातच एखादे सर्वसाधारण वाक्यही आक्षेपार्ह ठरू शकते, असेही शाहरूख खान म्हणाला.
आमीर खान याने गेल्या आठवड्यात देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली होती. त्यावरून अनेकांनी आमीर खानला विरोध केला होता. त्याच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2015 रोजी प्रकाशित
आमीरच्या मदतीला शाहरूख आला धावून, देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही
प्रत्येकाने देशाच्या भल्यासाठीच काम केले पाहिजे.
Written by विश्वनाथ गरुड

First published on: 01-12-2015 at 10:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One does not need to prove his patriotism says shah rukh khan