केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमधील परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच मणिपूरमध्ये मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. ‘आसाम ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मणिपूरच्या विषयावर मी यापूर्वी संसदेत बोललो आहे. तेथील संघर्ष रोखण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मणिपूरमधील संघर्ष रोखण्यासाठी कार्यरत होती. केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांमुळेच आज मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा झाली आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच मणिपूरमधील संघर्ष शिगेला पोहोचला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमध्ये तळ ठोकून होते. त्यावेळी त्यांनी १५ पेक्षा जास्त बैठका घेतल्या, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi said manipur situation improved due to central government timely intervention spb
First published on: 09-04-2024 at 08:32 IST