मोदी सरकारचे अपयश आणि सामाजिक सौर्हादासाठी तसेच काँग्रेसने महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांनीही येथे हजेरी लावली. मात्र, त्यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून राजघाट परिसरातून जाण्यास सांगण्यात आले आहे. हे दोन्हीही नेते १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीतील आरोपी आहेत.


दरम्यान, राजघाट परिसरात काँग्रेसच्या उपोषणासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा हे उपोषण सुरु होण्यास तब्बत तीन तास उशीर झाल्याने काँग्रेस नेते टीकेचे धनी बनले आहेत. सकाळी १० वाजता उपोषणाची वेळ ठरली होती मात्र, राहुल गांधी दुपारी १ वाजता राजघाटावर पोहोचले.


दरम्यान, पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते सुरजेवाला म्हणाले, मोदी सरकारच्या काळात देशातील समाजीक सलोखा आणि बंधुता धोक्यात आली आहे. त्यांना समाजात फुट पाडायची आहे. त्यामुळे अशा शक्तींविरोधात लढणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे. त्यामुळेच आम्ही येथे उपोषणासाठी बसलो आहोत.