scorecardresearch

Premium

विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी सामायिक दृष्टिकोनाची गरज, पंतप्रधान मोदी यांचे निती आयोगाच्या बैठकीत मार्गदर्शन

२०४७ सालापर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्याकरिता सामायिक दृष्टिकोन विकसित करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधोरेखित केली.

narendra modi niti ayog meeting
(फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

पीटीआय, नवी दिल्ली : २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्याकरिता सामायिक दृष्टिकोन विकसित करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधोरेखित केली. नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्यास सक्षम असे आर्थिकदृष्टय़ा दूरदर्शी निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी राज्यांना केले.

निती आयोगाच्या आठव्या प्रशासकीय परिषदेच्या (गव्हर्निग कौन्सिल) बैठकीला संबोधित करताना मोदी यांनी हे विचार मांडले. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते. आपल्याला आर्थिकदृष्टय़ा मजबूत बनवणारे आणि नागरिकांच्या कल्याणासाठीचे कार्यक्रम हाती घेण्यास सक्षम असे आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, असेही आवाहन पंतप्रधानांनी राज्यांना केले.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

 भारताला २०४७ सालापर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टाने निती आयोगाच्या आठव्या प्रशासकीय परिषदेत आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत विकास यांसह अनेक मुद्दय़ांवर विचारविनिमय करण्यात आला. पंतप्रधान मोदी हे या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत.  अमित शहा, निर्मला सीतारामन व पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री, तसेच उत्तर प्रदेश, आसाम, झारखंड व मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी झाले आहेत. पश्चिम बंगाल, पंजाब व दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला आहे. साधारणत:, संपूर्ण परिषदेची बैठक दरवर्षी होते. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ती ७ ऑगस्टला झाली होती. २०२० साली करोना महासाथीमुळे ती होऊ शकली नव्हती.

‘राज्यांची प्रगती, हीच देशाची प्रगती’

‘राज्यांची प्रगती होईल, तर भारताची प्रगती होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी निती आयोगाच्या बैठकीत सांगितले. २०४७ साली विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सामायिक दृष्टिकोन विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला,’ असे निती आयोगाने ट्विटरवर सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The need for a shared vision to achieve development goals ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×