पीटीआय, क्वालालंपूर
भारतात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा दिला जाणार नाही. त्याचबरोबर पाणी आणि रक्त एकत्र वाहूच शकत नसल्याची स्पष्टोक्ती ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची बाजू मांडण्यासाठी मलेशियाला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने केली.

मलेशियातील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले की, संयुक्त जनता दलाचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मलेशियातील पंतप्रधान विभागातील उपमंत्री (कायदा आणि संस्थात्मक सुधारणा) वायबी एम. कुला सेगरन आणि मलेशियातील पार्टी केडिलन राक्यात यांच्या नेतृत्वाखालील डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यांना दहशतवादाविरुद्ध भारताचा दृष्टिकोन आणि राष्ट्रीय दृढनिश्चय या वेळी कथन करण्यात आला.

सुरक्षित जगाचा संकल्प

माद्रिद : ‘द्रमुक’ पक्षाच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी स्पेनला भेट दिली. या वेळी स्पेनमधील दहशतवाद पीडितांच्या संघटनांशी झालेल्या बैठकीत ‘सुरक्षित’ जगासाठी भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्यात आला. ‘४,८०० दहशतवादग्रस्तांबरोबर असलेली संघटना ‘असोसिएशन डे व्हिक्टिमास डेल टेररिझमो’च्या वतीने सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर बैठक आयोजित केली.

ऑपरेशन सिंदूर’बाबत जगापर्यंत भारताचा संदेश पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळे तैनात असताना, देशातूनच राजकीय निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दु:खद आहे. देशभक्त असणे इतके कठीण आहे का?’

सलमान खुर्शीद, नेते, काँग्रेस</p>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय निष्ठेस लक्ष्य करणे दु:खद खुर्शीद

नवी दिल्ली : विविध देशांमध्ये सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जागतिक दहशतवादाला तोंड देण्यासाठी प्रयत्न करीत असताना, भारतात या प्रयत्नांमध्ये होत असलेल्या राजकीय विभाजनावर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सोमवारी चिंता व्यक्त केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये खुर्शीदही सहभागी आहेत.