शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेली पकड आजही कायम आहे. शरद पवार यांचा पक्ष मात्र फुटला आहे. ज्या ताकदीने त्यांनी हा पक्ष स्थापन करुन एक वेगळा करीश्मा दाखवला होता तशी बाब आत्ताच्या घडीला राहिलेली नाही. याचं कारण आहेत अजित पवार. अजित पवार यांनीच त्यांच्या काकांना म्हणजेच शरद पवारांना आव्हान दिलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य आणि त्यानंतर शरद पवारांनी केलेलं वक्तव्य. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी काय म्हटलं होतं?

लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातले दोन पक्ष लोप पावतील असं सूचक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना उद्देशून होतं का? हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र त्यांचा अंगुलीनिर्देश याच दोन पक्षांकडे होता. या पाठोपाठ शरद पवार यांनीही एक वक्तव्य केलं.

BJPs ex-MP leave party Big blow to BJP in East Vidarbha
भाजपच्या माजी खासदाराने ठोकला पक्षाला रामराम ; पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का
vijay wadettiwar, budget 2024,
अर्थसंकल्पावर वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले, “ही तर काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी”
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
Narendra Modi And Rahul Gandhi (4)
“हिंदू समाजाविरोधातील अपमानजनक वक्तव्ये योगायोग की…”, मोदींचं काँग्रेसविरोधात सूचक विधान; म्हणाले, “देवाच्या रुपांचा…”
What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांची मागणी, “राहुल गांधींनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे, त्यांनी आता लोकसभेत…”
Rahul Gandhi in Lok Sabha
“नरेंद्र मोदी अयोध्येतून लढले असते तर निश्चित पराभूत झाले असते”, राहुल गांधींची पहिल्याच भाषणातून टीका
rohit pawar on paper leak issue
पेपरफुटीचा कायदा याच अधिवेशनात आणणार का? रोहित पवारांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचे थेट उत्तर; म्हणाले…

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरु

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले “लोकसभा निवडणूक निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. अनेक प्रादेशिक पक्ष येत्या दोन वर्षांत काँग्रेसशी जवळीक साधू शकतात. काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. ” असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यामुळे राजयकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होईल ती वेळच सांगितली आहे.

हे पण वाचा- काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले…

देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या पक्षाबाबत काय म्हणाले?

“शरद पवारांचा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होईल असं त्यांना म्हणायचं असेल. त्यात काही नवल नाही. यापूर्वीही शरद पवारांनी अनेकवेळा पक्ष तयार केला आणि काँग्रेसमध्ये ते गेले. त्यामुळे आता त्यांनी संकेत दिले आहेत की आता त्यांचा पक्ष चालवणं त्यांना कदाचित शक्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष विलीन करतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपा आणि महायुतीला प्रचंड अनुकूल वातावरण आहे. आठही जागा आम्ही जिंकणार आहोत. नंदुरबारमध्ये प्रचंड बहुमताने जिंकतील. धुळ्यातही आमचे डॉ. भामरे विजयी होतील.” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.