कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून त्यातून त्याला सावरूनच दाखवू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, आता आजऱ्याचे रणशिंग फुंकले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी, आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांनी भरपूर प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आले नाही.

हेही वाचा : इथेनॉल निर्मिती बंदीचा तो निर्णय लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून – आमदार सतेज पाटील

online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
janswasthya coffee table book loksatta
पुण्यात ‘लोकसत्ता’च्या ‘जनस्वास्थ्य’चे आज प्रकाशन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती
Dhananjay Chandrachud
D Y Chandrachud : “…तर मी तुम्हाला हाकलून देईन”, सरन्यायाधीशांनी ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावलं
thackeray group strategy against mp sandipan bhumre dominance in paithan
पैठणमध्ये भूमरे यांच्या वर्चस्वाला शह देण्याची ठाकरे गटाची खेळी
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

आजरा कारखाना फार मोठ्या अडचणीत आहे. या कारखान्याची आर्थिक घडी विस्कटायची नसेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. काही घटना अशा घडल्या की एकमेकांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या निवडणुकीत आमचे राष्ट्रवादीचे पॅनल आहे. आजरा कारखान्याचा परिसर इको सेंसिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तिथे डिस्टीलरी व को- जन उभारण्याला बंदी आहे. ती बंदी काढावी लागेल. त्यासाठी प्रसंगी केंद्रात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटावे लागेल. डिस्टीलरी, इथेनॉल व को-जन हे तिन्ही प्रकल्प केल्याशिवाय तो कारखाना सुरळीत होणार नाही आणि हे करण्याची धमक आमच्यातच आहे, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.