कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्यात बुधवारी सामना रंगला. एका कार्यक्रमासाठी खासदार माने जात असताना त्यांना ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी ‘शिवसेनेशी गद्दारी का केली’, अशी विचारणा करीत रोखले. यातून ठाकरे-शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याने निर्माण झालेला तणाव पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने दूर झाला.

खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर व इचलकरंजी येथील सभेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र डागले होते. त्यावर माने समर्थक शिवसैनिकांनी राऊत हे इचलकरंजीला जात असताना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी, निदर्शने केली होती. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी माने यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली होती. त्यानुसार आज चंदूर (ता. हातकनंगले) येथे खासदार माने जात असताना त्यांचा ताफा अडवला.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
nashik ex soldier fraud marathi news
माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

हेही वाचा – पुणे: मेहनत घेत असतानाच मल्लाचे निधन

वादावादीमुळे तणाव

शिवसेनेची गद्दारी का केली, सहा महिन्यांसाठी शिवसेनेत येऊन तुम्ही हेरगिरी केली का, अशी विचारणा ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी केली. खासदार माने यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके, गद्दार माने, अशा घोषणा सुरू ठेवल्या. यातून माने समर्थक शिवसैनिक व ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्या बाचाबाची सुरू झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना पांगवल्याने तणाव निवळला.

हेही वाचा – अंगावर वीज पडून शेतकरी तरुणाचा मृत्यू

सर्व फुटिरांना जाब

खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी जिवाची बाजी केली होती. ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांना तसेच जिल्ह्यात सर्व फुटिरांना जाब विचारला जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केली.