भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रवी शास्त्री यांना क्रिकेट संघाच्या संघ संचालकपदावर नियुक्त करण्याबाबत कोणताही औपचारिक निर्णय घेतलेला नाही. बीसीसीआयच्या पुढील बैठकीत त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली यांनी दिली.
‘‘बीसीसीआयच्या पुढील बैठकीत प्रशिक्षकाचा निर्णय निश्चितपणे होईल,’’ असे गांगुलीने सांगितले. रोहित शर्माच्या कसोटी संघातील निवडीबाबत तो म्हणाला, ‘‘विराटला पाच गोलंदाजांसह खेळायचे होते. त्यामुळे एक फलंदाज कमी होणे स्वाभाविक आहे. फॉर्मात असल्यामुळे त्याला संधी मिळाली.’’