रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर आहे, असे कौतुकोद्गार भारताचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी काढले आहेत.

‘‘जागतिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून मी रोहित शर्माला पसंती देतो. रोहितच्या शतकी खेळींमध्ये नेहमीच मोठय़ा खेळींचा समावेश असतो. एकदिवसीय लढतींमध्ये तीन द्विशतके ही कामगिरी खरोखरच विलक्षण आहे,’’ असे श्रीकांत म्हणाले.

‘‘रोहित १५०, १८०, २०० धावा एकदिवसीय लढतींमध्ये करतो तेव्हा त्याच्यासारखा खेळाडू किती महान आहे हे लक्षात येते,’’असेही श्रीकांत यांनी सांगितले.