तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने न्यूझीलंडला १६८ धावांनी पराभूत करून द्विपक्षीय मालिकेतील आपले वर्चस्व कायम राखले. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत पुढचे दोन सामने जिंकले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला. मालिका २-१ ने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने टीमचा युवा आणि नवा खेळाडू पृथ्वी शॉ याच्या हातात ट्रॉफी सुपूर्द केली, जरी त्याला या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर पृथ्वी शॉला दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळाले. या सलामीवीराने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा टी२० सामना खेळला होता. शॉसारख्या स्फोटक फलंदाजाला मालिकेत किमान एक सामना खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती, पण हार्दिक पांड्याने इशान किशन आणि शुबमन गिल या सलामीच्या जोडीवर विश्वास दाखवला आणि तिन्ही सामन्यांमध्ये या जोडीसह मैदानात उतरले.

रणजी ट्रॉफीमध्ये लागोपाठ इनिंग खेळल्यानंतर पृथ्वी शॉने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेट सामन्यात त्रिशतकही ठोकले. त्यानंतर निवड समितीला त्याला संधी देणे भाग पडले. गिलने शेवटच्या सामन्यात शतक झळकावून कर्णधाराचा विश्वास जिंकला, मात्र तिन्ही सामन्यांमध्ये इशान फ्लॉप ठरला. शॉ ला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा: IND vs NZ 3rd T20I: गोलंदाज तोच, झेल घेणाराही तोच, फक्त फलंदाज बदलला! ‘द-स्काय’ सूर्याचा अ‍ॅक्शन रिप्ले; न्यूझीलंडचा सुपडासाफ

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुबमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २३४ धावांची मजल मारली. गिलने या काळात १२६ धावांची नाबाद खेळी खेळली. गिलशिवाय राहुल त्रिपाठीने २२ चेंडूत ४४ धावांची तुफानी खेळी केली.

भारताने ठेवलेल्या २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ६६ धावांत गारद झाला. यादरम्यान हार्दिक पांड्याने ४ तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश मिळाले. मर्यादित षटकांच्या मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर, भारताला आता ९ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

हेही वाचा: IND vs NZ 3rd T20I: अहमदाबादमध्ये शुबमन गिलचे वादळ! शतकांची मालिका सुरुच, न्यूझीलंडला फोडला घाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिकच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली

हार्दिकने संपूर्ण टी२० मालिकेत पृथ्वी शॉला संधी दिली नसली तरी विजयानंतर त्याने खिलाडूवृत्ती दाखवली. अहमदाबादमध्ये विजयाची ट्रॉफी स्वीकारल्यानंतर तो प्रथम पृथ्वी शॉकडे गेला आणि त्याच्याकडे ट्रॉफी सुपूर्द केली. यानंतर संपूर्ण टीमने मिळून ट्रॉफीसोबत फोटो काढले. यावेळी हार्दिकच्या या पावलाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.