जन्मानं मुंबईकर असलेल्या एजाज पटेलनं वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचला आहे. जिम लेकर व अनिल कुंबळेच्या पंगतीत बसताना एजाजनं पहिल्या डावात भारताचे दहाच्या दहा बळी घेतले.

चहापानादरम्यान दिलेल्या मुलाखतीत एजाज म्हणाला, ज्या मुंबईत जन्माला आलो तिथं ही कामगिरी करण्याचं समाधान वेगळंच आहे. अर्थात, ही कामगिरी बघण्यासाठी आई वडिल सध्या मुंबईत नसल्याचंही त्यानं सांगितलं.एजाज पटेल मुंबईतील पश्चिम उपनगरात रहायचा. जिम लेकर नं १९५६ मध्ये ही कामगिरी केली. विशेष म्हणजे जिम लेकर यांच्याच यॉर्कशायरमधून एजाज काउंटी खेळतो, हा योगायोगही चांगला असल्याचं तो म्हणाला. परंतु कुंबळे सरांच्या पंगतीत बसायचा मान मिळणं जास्त महत्त्वाचं असल्याची भावना त्यानं व्यक्त केली.

वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यामध्ये भारताच्या पहिल्या डावातले सर्व गडी एजाज पटेलनं एकट्यानं बाद केले. अशी कामगिरी करणारा तो जगातला फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळे आणि जिम लेकर यांनी ही कामगिरी केली आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.

IND vs NZ : क्या बात..! एजाज पटेलनं १० विकेट घेताच अश्विननं ड्रेसिंग रुममधून दिली दाद; VIDEO होतोय व्हायरल!

भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच!

१९५६मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. एजाजने १० बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा त्याने मोडीत काढला. त्यामुळे भारताविरुद्ध एकाच डावा १० बळी घेणारा देखील एजाज पटेल पहिलाच ठरला आहे.

PERFECT 10..! एजाज पटेलच्या भीमपराक्रमानंतर अनिल कुंबळेनं केलं ट्वीट; म्हणाला, ‘‘तुझं…”

एजाजच्या फिरकीची जादू

भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. त्यानंतर चहापानापर्यंत भारताला अजून दोन धक्के बसले. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कप्तान विराट कोहली यांना एजाजनेच शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि मयंकने किल्ला लढवला. या दोघांनी संघाला दीडशे धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दरम्यान मयंकने आपले अर्धशतकही पूर्ण केले. एजाजने पुन्हा गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने श्रेयसला (१८) यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर मयंकने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावसंख्या वाढवली.

Ind vs nz : “कृपया कोणत्याही भारतीयाला इतर देशात जाण्यासाठी सांगू नका”; एजाज पटेलच्या विक्रमानंतर इरफान पठाणचे ट्विट

दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयंकने आपले शतक पूर्ण केले. मयंक-साहाने अर्धशतकी भागीदारी रचत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. दुसऱ्य़ा दिवशीही एजाजने दमदार सुरुवात करत प्रथम वृद्धिमान साहा (२७) त्यानंतर रवीचंद्रन अश्विनला (०) माघारी धाडले. सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर मयंकसोबत अक्षर पटेलने अर्धशतकी भागीदारी रचली. लंचनंतर एजाजने भारताला अजून दोन धक्के दिले. त्याने दीशतक ठोकलेल्या मयंकला आणि त्यानंतर अक्षरला बाद करत आपला आठवा बळी नोंदवला. मयंकने १७ चौकार आणि ४ षटकारांसह १५० तर अक्षरने ५ चौकार आणि एका षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर एजाजने जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांचा अडथळा यांचा अडथला दूर करत विक्रमी १० विकेट्स घेतले. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला. एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेतले.