scorecardresearch

IND vs AUS: अक्षर की कुलदीप, कोणाला मिळणार संधी! माजी निवडकर्त्याने केलेल्या निवडीशी तुम्ही आहात का सहमत?

माजी निवड समिती सदस्य यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पहिल्या सामन्यात नक्की किती फिरकीपटू खेळवायचे आणि कोणाला संधी द्यावी यावर त्याने भाष्य केले आहे. रोहित शर्माला मोठी कसरत करावी लागणार.

IND vs AUS: Akshar or Kuldeep who should get the chance Former selector gave a big statement
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू होत आहे. दरम्यान, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यातील तिसऱ्या फिरकीपटूची निवड करणे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरले आहे. पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान द्यावे, कुलदीप की अक्षर यावरून वाद सुरू आहे. मागील निवड समितीचा भाग असलेल्या सुनील जोशीने अलीकडे कुलदीपला पाठिंबा दिला. रोहित शर्माला संघ निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

आता यात माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य जतिन परांजपे यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. परांजपे यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले, “रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेल हा भारताचा तिसरा फिरकी गोलंदाज असावा यावर माझ्यासाठी वाद नाही. तो ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याला विकेट्स मिळतील, अक्षर हा एक सोपा पर्याय आहे.” त्यांचे माजी सहकारी देवांग गांधी यांनी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत तिसर्‍या फिरकी गोलंदाजाच्या भूमिकेसाठी अक्षरची निवड केली आहे.

अक्षर कुलदीपपेक्षा चांगला पर्याय

माझी निवड समिती सदस्य देवांग गांधी म्हणाले, “जर तुमच्याकडे सुरुवातीपासूनच यश मिळवून देणारी खेळपट्टी असेल तर कुलदीपपेक्षा अक्षर हा एक चांगला पर्याय आहे. अशा खेळपट्ट्यांवर कुलदीचा चेंडू चौकोनी वळू लागतो, त्याला फटका बसण्याची शक्यता असते. तसेच जेव्हा तो सपाट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो थोडा कमी पडतो. अक्षर पटेलच्या बाबतीत तसे नाही. तसेच, एक डावखुरा फलंदाज असल्याने तो खालच्या मधल्या फळीत भक्कम पर्याय आणेल,” तो पुढे म्हणाला.

अक्षरने कुलदीपपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत

ऑस्ट्रेलियाने शेवटचा भारत दौरा केला तेव्हा २०१७ मध्ये कुलदीपने भारतासाठी संस्मरणीय कसोटी पदार्पण केले. त्याने भारताच्या दणदणीत विजयात चार विकेट्स घेतल्या. कुलदीपची यापूर्वीची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. चांगली फलंदाजीही केली. मात्र, सांघिक कामगिरीमुळे त्याला पुढील कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. दुसरीकडे अक्षरने भारतासाठी अनेक सामने खेळले असून त्याने कुलदीपपेक्षा १३ बळी घेतले आहेत. दोन्ही गोलंदाज भारतासाठी उपयुक्त आहेत, मात्र कर्णधार रोहित शर्मा कोणत्या संघासोबत मैदानात उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS: विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या शुबमनची ‘या’ महान गोलंदाजासमोर झाली होती सिट्टी पिट्टी गुल! Video व्हायरल

रोहित-गिल की रोहित-राहुल, कोणती असेल सलामीची जोडी?

सलामीच्या जोडीबाबतचा सर्वात मोठा प्रश्न सध्या कायम आहे. मात्र, सराव सत्रात रोहित आणि गिल एकत्र फलंदाजी करताना दिसले. तर राहुल विराट आणि पुजारासोबत सराव करताना दिसला. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापन कदाचित केएल राहुलकडे मधल्या फळीची जबाबदारी सोपवेल. कारण केएल राहुलला मधल्या फळीत अनुभव आहे पण शुभमन गिल या बाबतीत अननुभवी आहे. तो बहुतेकदा ओपनिंग करताना दिसला आहे. त्यामुळे ही एक चांगली चाल असू शकते आणि या सर्वात मोठ्या प्रश्नाचे सोपे आणि सोपे उत्तर देखील असू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:09 IST