भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळू शकतो. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर रोहित शेवटचा वनडेही खेळू शकला नाही.

रोहित पहिल्या कसोटीलाही मुकला आणि त्याला मुंबईला परतावे लागले. त्यानंतर तो आपल्या दुखापतीसाठी एका तज्ज्ञाला भेटला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितने स्वतः टीम मॅनेजमेंटला कळवले आहे की तो दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध असेल.रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शनिवारी (१७ डिसेंबर) बांगलादेशला पोहोचू शकतो.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

रोहितने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत होऊनही फलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या होत्या, तरीही तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्या सामन्यात रोहित डावाची सुरुवात करण्यासाठी आला नाही आणि ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर रोहित शर्मा एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: शुबमन गिलने झळकावले कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक: भारताची आघाडी ४०० धावांच्या पार

रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश करण्यात आला होता –

पहिल्या कसोटीसाठी रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, पहिल्या कसोटीत केएल राहुल आणि शुबमन गिलने सलामी दिली. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. भारत आणि बांगलादेश मधील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याची सुरुवात २२ डिसेंबर पासून होईल.