India vs West Indies 3rd T20I Highlights Update: भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सात विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत कायम आहे. भारताच्या विजयानंतर मालिकेतील स्कोअर २-१ असा वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या आणि भारताने तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने ५ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या आहेत. ब्रेंडन किंगने ४२ आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाबाद ४० धावा केल्या. या दोघांशिवाय मेयर्सने २५ आणि पूरनने २० धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या मालिकेतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. सूर्यकुमार यादव (४४ चेंडूत ८३ धावा) आणि तिलक वर्मा (३७ चेंडूत नाबाद ४९ धावा) यांनी भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२०सामन्यात विजय मिळवून दिला. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर मंगळवारी भारताने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने १६० धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने १७.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. भारतासाठी हा 'करो किंवा मरो' सामना होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत आठ वेळा टी२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. यादरम्यान टीम इंडियाने सहा मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजला केवळ दोन मालिकांमध्ये यश मिळाले. २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर विंडीजने त्यांच्या भूमीवर एक सामन्याची मालिका १-० अशी जिंकली होती. यापूर्वी २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने त्यांच्या यजमानपदावर दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती. अशा परिस्थितीत सहा वर्षांनंतर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावू नये यासाठी भारताचा प्रयत्न असेल.