आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन तीन आठवडे झालेले आहेत. सर्व सामने सुरळीत सुरु असताना आता दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणारा सामना हा पुणेऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे. प्रवासादरम्यान करोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीच्या ताफ्यात एकूण पाच जणांना करोनाची लागण

दिल्लीच्या ताफ्यात एकूण पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना करोनाची लागण झाल्याचे १५ एप्रिल रोजी समोर आले होते. मसाज थेरेपिस्ट चेतन कुमार यांनादेखील करोनाची लागण झाल्याचे १६ एप्रिल रोजी समोर आले होते. तर १८ एप्रिल रोजी दिल्लीचा खेळाडू मिशेल मार्श, टीमचे डॉक्टर अभिजित साळवी आणि सोशल मीडिया कंटेट टीमचे सदस्य आकाश माने या तिघांना करोना करोनाची लागण झाली होती. पाच जणांना करोनाची लागण झाल्यामुळे दिल्ली संघाने आपला पुणे प्रवास तत्काळ रद्द केला होता.

पुण्यातील सामना मुंबईला होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. २० एप्रिल रोजी दिल्ली आणि पंजाब यांच्यात पुणे येथील एमसीए स्टेडियमवर सामना होणार होता. मात्र हा सामना आता पुणे ऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास टाळण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.