Vijay Mallya RCB IPL Winner: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२५ च्या रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत पहिले जेतेपद पटकावले. बंगळुरूने आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे माजी मालक विजय मल्ल्या यांनी एक्सवर पोस्ट करत संघाचे अभिनंदन केले आहे.

“१८ वर्षांनी अखेर आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. २०२५ च्या स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये उत्कृष्ट कोचिंग आणि सपोर्ट स्टाफसह संघाने संतुलित धाडसी खेळ केला. खूप खूप अभिनंदन! ई साला कप नाम दे!!”, असे विजय माल्या यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान सोशल मीडियावर विजय मल्ल्या यांची पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाले आहे. त्यांच्या या पोस्टला काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि रिट्विट मिळाले.

या हंगामात आरसीबीने सातत्यपूर्ण कामगिरी करत विजेतेपदापर्यंतचा टप्पा गाठला. यामध्ये संपूर्ण हंगामात विराट कोहली, फिल सॉल्ट, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवूड, जितेश शर्मा आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत संघाच्या आयपीएल विजेतेपदाच महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने निर्धारीत २० षटकांत ९ बाद १९० धावा केल्या होता. यामध्ये विराट कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह सर्वाधिक ४३ धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने १६ चेंडूत २६ धावा करत मधल्या षटकांमध्ये संघासाठी महत्त्वाच्या धावा केल्या. दुसरीकडे पंजाब किंग्जसाठी, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ४ षटकांत ४० धावांत ३ बळी घेतले.

विजयासाठी १९१ धावांचा पाठलाग करताना, पंजाब संघाने सुरुवातीच्या तीन षटकांत चांगलीच फटाकेबाजी केली. मात्र, त्यानंतर त्यांचा एक एक फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेला. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिसने २३ चेंडूत ३९ धावा (१ चौकार, ४ षटकार) मारत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तर, शशांक सिंगने ३० चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ६१ धावा केल्या. पंजाब किंग्जला निर्धारित २० षटकांत ७ बाद १८४ धावांपर्यंतच मजल गाठता आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृणाल पंड्या सामनावीर

दरम्यान अष्टपैलू कृणाल पंड्याने आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ४ षटकांत १७ धावांत दोन बळी मिळवले. कृणालला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.