World Cup 2023, India vs Australia Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारताचा पहिला सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १९९ धावांवर ऑलआउट केले. मात्र यानंतर टीम इंडियाची सुरुवातही लाजिरवाणी झाली. भारताचे टॉप ३ फलंदाज शून्यावर बाद झाले. भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच तीन आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. वर्ल्ड कप २०२३ मधील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना होता आणि बॅटिंगमध्ये त्याची सुरुवात लाजिरवाणी झाली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित आणि इशान सलामीला आले होते. इशान किशन पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर जोश हेझलवूडने दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला शून्यावर बाद करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे की तीन आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले.

Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
IND vs AUS 5 Big Reasons Why India Failed to Retain Border Gavaskar Trophy Against Australia
IND vs AUS: भारतीय संघावर १० वर्षांनी का ओढवली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की? वाचा भारताच्या पराभवाची कारणं
India Disqualified From WTC Final After Defeating in Border Gavaskar Trophy Australia vs South Africa
WTC Final: भारत WTC फायनलसाठी ‘नापास’; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेत रंगणार अंतिम सामना
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक

भारताने ४० वर्षे जुन्या इतिहासाची केली पुनरावृत्ती –

टीम इंडियाने २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली होती. पण त्याचा शेवट खूप वाईट झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध अशीच सुरुवात केली होती. त्या काळात भारताने अवघ्या ५ धावांवर आपले ३ फलंदाज गमावले होते. आता भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या २ धावांत आपले ३ फलंदाज गमावले. टीम इंडियासोबत विश्वचषकातील ही दुसरी वेळ आहे की दोन्ही सलामीवीर शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध १९८३ मध्ये भारतासोबत पहिल्यांदाच अशी घटना घडली होती.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया कोणत्या रंगाची जर्सी परिधान करणार भगव्या की निळ्या? बीसीसीआयने केले स्पष्ट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७१ चेंडूंचा सामना करत ४६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने ५२ चेंडूंचा सामना करत ४१ धावा केल्या. लाबुशेनने २७ धावा केल्या. यादरम्यान जडेजाने भारताकडून ३ विकेट्स घेतल्या. त्याने १० षटकात २८ धावा देत २ मेडन्स टाकल्या. कुलदीप यादवने १० षटकात ४२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहनेही २ २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.

Story img Loader