India vs West Indies 2nd T20: भारताला यावर्षी एकदिवसीय विश्वचषक मायदेशात खेळायचा आहे. यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन खूप प्रयोग करत आहे आणि सर्व प्रकारच्या खेळाडूंना आजमावून बघत आहे. टीम इंडियाचा विश्वचषकात योग्य प्लेइंग कॉम्बिनेशन असावी यासाठी चाचपणी करत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत एक खेळाडू असा आहे जो संघात असूनही भारतीय एकदिवसीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. हा खेळाडू दुसरा कोणी नसून युजवेंद्र चहल आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० च्या आधी, चहलने सांगितले की त्याला एकदिवसीय सामन्यात संधी का मिळत नाही? यासाठी त्याने काही खेळाडूंना जबाबदार धरले आहे. वन डे न खेळण्याचे कारण खुद्द चहलने दिले आहे. या लेगस्पिनरने २४ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य

हेही वाचा: Asia Cup 2023: तमिमचा तडकाफडकी राजीनामा अन् ‘या’ खेळाडूला कॅप्टन्सीची संधी, बांगलादेश क्रिकेट बोर्ड उचलणार मोठे पाऊल

चहल आयपीएलनंतर पहिल्यांदाच खेळत आहे

चहल आयपीएलनंतर पहिल्यांदाच खेळत आहे. आपल्यापेक्षा कुलदीप यादवला का प्राधान्य दिले जात आहे, हेही चहलने स्पष्ट केले. मात्र, त्याने आशिया चषक आणि विश्वचषक संघात स्थान मिळवण्याची आशा सोडलेली नाही. चहलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. चहलने आयपीएलनंतर पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये खेळला. सुरुवातीच्या षटकात दोन विकेट्स घेत त्याने संघातील आपले अस्तित्व जाणवून दिले, पण भारताने हा सामना चार धावांनी गमावला होता.

टीम कॉम्बिनेशनबद्दल चहल काय म्हणाला?

दुसऱ्या टी२०पूर्वी चहल म्हणाला, “टीम कॉम्बिनेशन हे आमचे प्राधान्य आहे आणि ही काही नवीन गोष्ट नाही. सातव्या क्रमांकावर आम्ही सहसा रवींद्र जडेजा किंवा अक्षर पटेलला खेळवतो. विकेट फिरकीला अनुकूल असते तेव्हाच तीन फिरकीपटू खेळू शकतात. कुलदीप खरोखर गोलंदाजी करतो. तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि म्हणूनच संघ त्याच्या पाठीशी आहे. मी नेटमध्ये काम करत आहे जेणेकरून मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी त्याचा फायदा घेऊ शकेन.”

हेही वाचा: IND vs WI: भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या टी२० सामन्याआधी गेला एका खास ठिकाणी, कोणते आहे ते? जाणून घ्या

चहल संघात सहभागी झाल्याने खूश आहे

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी सर्व खेळाडूंचे एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित असताना, चहल जानेवारीपासून एकही सामना खेळलेला नाही. तो म्हणाला, “आम्ही व्यावसायिक क्रिकेटर आहोत. मी दोन महिन्यांनंतर खेळत होतो. मागच्या वेळी मी आयपीएल खेळलो होतो. ही सर्व विश्वचषकाच्या तयारी सुरु आहे, इथे वैयक्तिक हेवेदावे अजिबात नाहीत. तुम्ही तुमच्या संघासाठी खेळत आहात, कधीकधी खेळाडूंना हे करावे लागते. जर त्याला दोन मालिकांसाठी संघाबाहेर बसावे लागले तर त्याचा अर्थ तो संघाचा भाग नाही असा होत नाही.” सहा महिने का तो खेळू शकला नाही, यावर त्याने हे उत्तर दिले आहे.