या आधुनिक जीवनशैलीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे हे मोठे आव्हान आहे. स्वत:ला निरोगी, सडपातळ व सुंदर ठेवण्यासाठी लोक अनेक युक्त्या अवलंबतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी अन् फिटनेस राखण्यासाठी उपवास करतात; तर काही लोक श्रद्धा म्हणून व्रतवैकल्ये करीत असतात. या उपवासामधील सर्वांत महत्त्वाचा भाग हा आहार असतो याचा आपण कधी विचार केला आहे का? उपवासादरम्यान योग्य आहार घेणे आवश्यक असते. हा आहार जर उत्तम आणि योग्य पद्धतीने घेतला, तर त्याचे शरीराला दीर्घकालीन फायदे होतात; अन्यथा तुम्हाला वेगवेगळे आजारही होण्याचा धोका असतो.

आपल्यापैकी बहुतेक लोकांना असे वाटते की, उपवास केल्याने वजन कमी होते. अनेक जण आहार स्किप करतात? त्यांना असे वाटते की, यामुळे त्यांना स्लिम आणि ट्रिम फिगर मिळविणे सोपे होईल. पण, उपवास केल्यामुळे वजन कमी करण्यात, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते का? याच विषयावर अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : पाठदुखीची समस्या दूर करण्यासाठी योगासने फायदेशीर ठरु शकतात? तज्ज्ञ काय सांगतात… )

अभ्यासात असे दिसून आले आहे की, उपवास केल्याने शरीराचे वजन, चरबी, रक्तातील साखर, रक्तदाब व कोलेस्ट्रॉल कमी होते. उपवासाच्या आधीच्या जेवणासाठी संपूर्ण धान्य (ओट्स, संपूर्ण गव्हाचा ब्रेड), कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, शेंगा, फळे, भाज्या, नट आणि निरोगी चरबी यांसारख्या पोषक व फायबरसमृद्ध पर्यायांची निवड करा. बियाणे, कमी चरबीयुक्त डेअरी किंवा वनस्पती-आधारित पर्याय निवडा.

तपकिरी तांदूळ किंवा संपूर्ण गव्हाचा ब्रेड, चिकन किंवा मसूर यांसारखी पातळ प्रथिने आणि भरपूर भाज्या असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असलेल्या संतुलित जेवणाचे अनुसरण करा. सूपदेखील उत्कृष्ट पर्याय आहे. कारण- ते हायड्रेटिंग आणि पौष्टिक समृद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराब जीवनशैली आणि आहारामुळे बहुतेक लोकांसाठी लठ्ठपणा ही समस्या बनत आहे. लठ्ठपणाची वेळीच काळजी घेतली नाही, तर अनेक शारीरिक समस्या उदभवू शकतात. उपवास ठेवल्याने वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. अधूनमधून उपवास केल्याने चरबी कमी केली जाऊ शकते. उपवास केल्याने कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासूनही आराम मिळतो. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो. एका दिवसाच्या अंतराने उपवास करून कोलेस्ट्रॉल कमी करता येते. तुम्ही उपवास केल्यामुळे वजन कमी होऊ शकते आणि तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. अशा लोकांना डायबेटिस, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका कमी असतो.