Cold Water Bath Benefits : हिवाळ्याच्या दिवसात तापमान कमी होत जाते. पुढच्या दोन ते तीन आठवड्यात थंडीत जास्त वाढ झालेली दिसून येईल. अशात निरोगी राहण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. हिवाळ्यात लोक गरम पाण्याने अंघोळ करतात, तर काही जण हिवाळ्याच्या दिवसातही थंड पाण्याने अंघोळ करतात. अंघोळीसाठी तुम्ही कोणता साबण वापरता हे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे पाणी, पाण्याचे तापमान याचाही तब्येतीवर परिणाम होतो. परंतु, थंडीच्या महिन्यात थंड पाण्याने अंघोळ करणे खरोखर सुरक्षित आहे का?

आरोग्यतज्ज्ञ ईशा लाल स्पष्ट करतात की, थंड शॉवरमुळे रक्ताभिसरण सुधारणे, मानसिक सतर्कता आणि शरीरातील जळजळ कमी करणे यासह अनेक फायदे मिळू शकतात. “थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढतो.” त्यांनी असंही सांगितले की, “२०१६ च्या जर्नल ऑफ PLOS ONE मध्ये केलेल्या अभ्यासात, जे लोक थंड पाण्याने अंघोळ करतात त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं, असं समोर आलं आहे

बेंगळुरू येथील व्रुधी स्किन सेंटर अँड सर्जरी क्लिनिकचे सल्लागार आणि मुख्य त्वचाविज्ञानी डॉ. अमृता होसल्ली कर्जोल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. अमृता सांगतात की, थंड पाण्याने अंघोळ केल्याचे बरेच फायदे असले तरीही काही लोकांना याचा त्रास होऊ शकतो. जसे की, ज्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या आणि हृदयाची समस्या असते अशा लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. “कधी कधी थंड पाण्याच्या शॉवरमुळे हिवाळ्याशी संबंधित त्वचेच्या समस्या, जसे की कोरडेपणा, खाज सुटणे किंवा एक्झिमा आणि सोरायसिससारख्या समस्यांनी परिस्थिती बिघडू शकते. संवेदनशील किंवा आधीच कोरडी त्वचा असलेल्यांनी हिवाळ्यात थंड पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता बिघडू शकते.” थंडीमुळे हायपोथर्मिया होऊ शकतो किंवा श्वसनाच्या समस्या वाढू शकतात, विशेषत: दमा असलेल्यांसाठी.

हेही वाचा >> दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल

हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी पाण्याचे तापमान काय असावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्यतज्ज्ञ ईशा लाल यांच्या मते, बहुतेक लोकांसाठी, कोमट पाणी (सुमारे ३७-४०°C किंवा ९८-१०४°F) हिवाळ्यात आदर्श असते, कारण ते स्नायूंना आराम देण्यासाठी. तुम्हाला रक्ताभिसरण सुधरवायचं असेल तर थंड पाण्याने अंघोळ करा. ईशा लाल यांनी असेही सांगितले की हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते.