Diet For Malaria : जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने २००७ मध्ये मलेरिया आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस घोषित केला. संक्रमित मादी ऍनोफेलिन डासांच्या चाव्याव्दारे होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे अशक्तपणा, ताप आणि स्नायूंमध्ये क्रॅम्प सुरू होतात.
या आजारातून योग्यप्रकारे रिकव्हर झाले नाही तर त्याचा परिणाम यकृत आणि किडनीवरही होतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मलेरियाच्या रुग्णांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हा या आजारातून लवकर बरे होऊ शकता.
Nail Rubbing : नखांवर नख घासल्याने खरचं केसांची चांगली वाढ होते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
प्रथिनेयुक्त आहार खा
मलेरियाच्या तापामुळे शरीराचे खूप नुकसान होते. या आजारात स्नायूही कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज असते. मलेरियापासून लवकर बरे होण्यासाठी प्रथिनांचे सेवन करणे फार महत्वाचे आहे. रुग्णांच्या आहारात मसूर, दूध, मूग डाळ, चणे आणि अंडी यांचा समावेश असावा, याशिवाय शेंगा, काजू, हिरव्या भाज्याही खाऊ शकतात.
हायड्रेटेड रहा
मलेरियातून लवकर बरे होण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या. तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाणी, लिंबू पाणी आणि अशा फळांचा समावेश करू शकता, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. काकडी, संत्र्याप्रमाणेच ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्ही लवकर बरे होऊ शकता.
आंबट फळे खा
मलेरियाच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना आंबट फळे खायला दिली पाहिजेत. त्यासाठी लिंबू, संत्री, द्राक्षे इत्यादींचा आहारात समावेश करता येईल. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने तुमचे शरीर डिटॉक्स करते. यामुळे रोगाशी लढण्यास मदत होते,
आहारात सुक्या मेव्याचा समावेश करा
मलेरियाच्या रुग्णांच्या आहारात अधिक फायटोन्यूट्रिएंट्सचा समावेश करण्याची गरज आहे, जे संसर्गाचा धोका टाळण्यास उपयुक्त आहे. यासाठी सुका मेवा किंवा बियांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. कारण त्यात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सही आढळतात.
मलेरियाच्या रुग्णांनी काय खाऊ नये
मलेरिया झालेल्या रुग्णांनी तळलेले पदार्थ खाणे टाळावेत, कारण त्यामुळे मळमळ, उलट्या आणि जठरासंबंधी समस्या होऊ शकतात. सीलबंद प्रक्रिया केलेले अन्न देखील कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. रुग्णाला फक्त घरी शिजवलेले अन्नच द्यावे. रुग्णाचे अन्न जास्त तेलकट किंवा मसालेदार नसावे याची विशेष काळजी घ्यावी.