मुस्लीम बांधवांच्या मनात भाजपच्या विरोधकांनी चुकीचा समज पसरविला आहे; मात्र भाजप सत्तेवर आल्यास त्या समाजातील जनतेच्या मनातील हा समज निश्चितच दूर होईल. घटनेतील निकषांना अनुसरूनच आमचे सरकार कारभार करील, असे  नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. गुजरातमधील पाळत प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नियुक्त करण्याची घोषणा करून काँग्रेसचे सरकार सुडाचे राजकारण करीत आहे. मोदी आणि भाजपने जे चित्र रंगविले आहे ते एकच आहे. सरकार घटनेनुसारच कारभार करणार असल्याचे शहा म्हणाले. मोदींचे सरकार असो की वाजपेयी यांचे, देशाचा कारभार घटनेला अनुसरूनच व्हावयास हवा, असेही त्यांनी सांगितले.